तिघांना मारहाणीत नाहक गोवले; पालक ५ फेबुवारीपासून आमरण उपोषण करणार

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात ६ डिसेंबर २०२४ रोजी झालेल्या हाणामारी प्रकरणात १० संशयितांवर गुन्हा दाखल झाला. या घटनेशी संबंध नसलेल्या ३ तरुणांना नाहक अडकवण्यात आले आहे.यासंबंधीचे सीसीटीव्ही फुटेज देऊनही पोलिसांनी कार्यवाही केलेली नाही. मुख्य संशयित आरोपींना ५५ दिवसांत अटक झालेली नाही.मात्र सहभाग नसलेल्या मुलांना अद्यापही दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे या तिन्ही मुलांच्या पालकांनी विविध सेवाभावी संस्थांसह ५ फेबुवारीपासून उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सामाजिक कार्यकर्ते शाहनवाज शाह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button