
संकटाच्या काळात कुणीही राजकारणाचा डमरू वाजवू नये-केद्रीय मंत्री नितीन गडकरी
कोरोनाच्या संकटकाळात महाराष्ट्रातील नेत्यांनी राजकारण करू नये. राजकारणापेक्षा राष्ट्रकारणाला प्राधान्य द्यावे, असा सल्ला केद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना दिला आहे. कोरोनाच्या संकटाच्या काळात कुणीही राजकारणाचा डमरू वाजवू नये. मलादेखील अनेकदा महाराष्ट्र सरकारच्या काही बाबी पटत नाहीत. तेव्हा मी थेट मुख्यमंत्री किंवा सचिवांशी चर्चा करतो. चुका सगळ्यांकडून होतात, अशावेळी चर्चा करुन मार्ग काढायचा असतो. एकमेकांवर जाहीर टीका करून वाद निर्माण करणे टाळायला पाहिजे’, असे म्हणत अप्रत्यक्षपणे भाजपा नेत्यांचे कान टोचले आहेत
www.konkantoday.com