पार्सल गाडीला चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे कोकणरेल्वे गाडीची आणखी फेरी सोडणार

कोकण रेल्वे मार्गावर सुरु करण्यात आलेल्या ओखा-तिरुवअनंतपुरम या पार्सल गाडीला पहिल्याच फेरीला चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे २७ एप्रिलला दुसरी फेरी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोनासारख्या राष्ट्रीय आपत्तीत जीवनावश्यक वस्तूंची वाहतुक करण्यासाठी रेल्वे प्रशासन पुढे सरसावले होते.या पार्सल गाडीमधुन औषधांबरोबरच मासळीचीही वाहतूक केली गेली. पहिल्या फेरीच्या परतीचा प्रवास सुरु होणार असून त्यातून कोकणातील हापूस अहमदाबाद मार्केटला पाठविणे शक्य आहे. पहिल्या फेरीला मिळालेला प्रतिसाद पाहून रेल्वे प्रशासनाने ओखा-तिरुवअनंतपुरम पार्सल गाडीची दुसरी फेरी २७ला सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ती २९ ला तिरुवअनंतपुरमला पोचेल. ती गाडी २८ ला सकाळी ११.३० ला रत्नागिरीत पोचेल. तीचा परतीचा प्रवास २९ला सुरु होणार असून ३०ला ती रात्री २३.१० वाजता रत्नागिरी स्थानकात येईल
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button