कोकणवासीयांना त्यांच्या गावात परत येण्यासाठी विषेश ट्रेनची व्यवस्था करावी-माजी आमदार डॉ. विनय नातू

गुहागरचे माजी आमदार व उत्तर रत्नागिरीचे भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांनी ठाणे, मुंबई व पालघर येथे राहणाऱ्या कोकणवासीयांस त्यांच्या गावात परत येण्यासाठी विषेश ट्रेनची व्यवस्था करावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडे एका पत्राद्वारे केली आहे.
कोकणातील चाकरमानी मुंबई शहरात १०X १० च्या खोलीत दाटीवाटीने रहात असल्याने व अनेक ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहे आहेत. मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने मुंबईतील या चाकरमान्यांना व त्यांच्या कुटुंबियांना आता मुंबईत राहायचे नसून कोकणातील आपापल्या गावी परत यायचे आहे.
कोकणातील चाकरमान्यांना गावी येणेकरिता विशेष रेल्वेची मागणी केंद्र सरकारकडे करावी अशी विनंती डॉ. नातू यांनी मुख्यमंत्री यांचेकडे केली आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button