
रत्नागिरी जिल्ह्याची वाटचाल ग्रीन झोनकडे सुरू-ना.उदय सामंत
रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हाबंदीचे नियम काटेकोरपणे पाळले जात आहेत. मात्र तरीही कायद्याचे उल्लंघन करून आडमार्गाने जिल्ह्यात येणार्याना प्रत्येकाला २८ दिवस विलगीकरणात ठेवले जाईल, असा इशारा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिला.
श्री. सामंत यांनी रत्नागिरी जिल्ह्याची करोनाविषयक आढावा बैठक घेतली. त्यानंतर अल्पबचत सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले की, रत्नागिरी जिल्ह्याची वाटचाल ग्रीन झोनकडे सुरू झाली आहे. जिल्ह्याची सर्व यंत्रणा एवढ्या चांगल्या पद्धतीने राबत आहे की जिल्ह्याची ऑरेंज झोनमधून ग्रीन झोनकडे वाटचाल सुरू झाली आहे.
प्रतिबंधित केलेल्या राजिवडा भागातही आता हळूहळू शिथिलता आणली जाणार आहे. लॉकडाउनमध्ये (दि. २१ एप्रिल) शिथिलता आणली गेली आहे. त्याअनुषंगाने काही व्यापारी संघटना, वाहतूक संघटना आणि रिक्षा संघटनेची बैठक घेतली. व्यापारी यानी कामगारांना ये-जा करण्यासाठी पासेसची मागणी केली आहे. त्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे. वाहतूकदारांनीही आपल्या समस्या मांडल्या. त्यांनाही लायसेन्स, पीयूसी, पासिंग इन्शुरन्स आदींमध्ये ३० जूनपर्यंत सवलत दिली आहे. रिक्षा संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक झाली. ज्यांच्याकडे रिक्षाव्यतिरिक्त दुसरे वाहन नाही, त्यांना काही अत्यावश्यक सेवेसाठी रिक्षा वापरण्याची परवानगी देण्यात येणार आहे. नाभिक समाजाबाबत अफवा पसरविल्या जात आहेत. त्याबाबतही बैठक होणार आहे.
रत्नागिरी जिल्हा लवकरच कोरोनामुक्त होईल असेही त्यानी सांगितले
www.konkantoday.com