अडचणीत आलेल्या नागरिकांना आवश्यक मदत कार्यात सर्व पतसंस्था योगदान देणार

रत्नागिरी पतसंस्था प्रतिनिधींच्या बैठकीत कोरोना लॉकडाऊन स्थितीमुळे अडचणीत आलेल्या नागरिकांना आवश्यक मदत कार्यात सर्व पतसंस्था योगदान देण्याचा निर्धार करण्यात आला रत्नागिरी येथील नगर वाचनालय सभागृहात जिल्हा पतसंस्था फेडरेशन सहकार खाते यांच्या संयुक्त विद्यमाने तातडीने बैठक सोशल डीसटन्सचे तत्व पाळत घेण्यात आली. रत्नागिरीचे पोलिस अधिक्षक मुंढे साहेबांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली रत्नागिरीतील २७ पतसंस्था प्रतिनिधींनी या बैठकीत सहभाग दिला.पोलिस अधिक्षक डॉ. मुंढे यांनी सर्व पतसंस्थांना कोरोना लॉकडाऊनमुळे उद्भवलेल्या स्थितीचा सामना करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने सामना करुया.पतसंस्थांनी आपले योगदान गरजू अडचणीत सापडलेल्या नागरिकांसाठी द्यावे.पतसंस्थांनी कायद्याच्या चौकटीत रहात हे योगदान द्यावे असे आवाहन केले.या आवाहनाला प्रतिसाद देण्यामध्ये रत्नागिरीतील पतसंस्था सकारात्मक
प्रतिसाद देतील गरजूंच्या गरजा पुरवण्यासाठी आवश्यक मदत पतसंस्था तत्काळ करतील. सामाजिक बांधिलकी जवळ बांधील रहात कायद्याच्या चौकटीत रहात पतसंस्था भरीव योगदान देतील, असा विश्वास पतसंस्था फेडरेशनचे व स्वरूपानंद पतसंस्थेचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केला.या प्रसंगी जिल्हा उपनिबंधक डॉ.अशोक गार्डी यांनीही पतसंस्थांनी अडचणीची स्थिती लक्षात घेऊन योग्य योगदान द्यावे,
असे आवाहन केले. सर्व संस्थाच्या प्रतिनिधींनी आपण पुरेसे योगदान देऊ व आपली
जबाबदारी पार पाडू असे आश्वासन दिले. या प्रसंगी शिववैभव पतसंस्थेचे संतोष घेरडे यांनी रु.२५,०००/- चा धनादेश डॉ. मुंढे साहेबांकडे सुपूर्त केला.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button