रत्नागिरी जिल्ह्यात खेड, चिपळूण, लांजा, मंडणगड या चार तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा

रत्नागिरी जिल्ह्यात खेड, चिपळूण, लांजा मंडणगड या चार तालुक्यात टँकरने पाणीपुरवठा सुरु झालाआहे . चार तालुक्यातील १८ गावातील ३० वाड्यांना टंचाईची झळ बसत असून सात टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात दिवसेंदिवस उन्हाचा पारा काहीली वाढल्याने पाण्याच्या पातळीवर त्याचा परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे नद्या, नाले कोरडे पडू लागले आहेत. काही विहिरींची पातळीही खाली जाऊ लागली आहे. वाड्या-वस्त्यांना पाणीपुरवठा करणारे पर्याय आटू लागल्याने टँकरची मागणीही वाढू लागली आहे. यंदा कोरोनामुळे टंचाई आराखड्यातील अनेक छोट्या-छोट्या पाणी योजनांच्या दुरुस्तीची कामे झालेली नाहीत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button