
नैसर्गिक आपत्ती निधी जिल्ह्यासाठी देण्याची आमदार भास्कर जाधव यांची मागणी
रत्नागिरी जिल्हा प्रशासन कोरोनासारख्या महाभयानक रोगाचा सामना करत असताना जिल्हा प्रशासनाकडे नैसर्गिक आपत्ती कक्षात निधी शिल्लक नाही. यामुळे गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी तत्काळ उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांना फोन करून जिल्ह्यासाठी निधी देण्याची मागणी केलीअर्थमंत्री अजित पवार यांनी प्रस्ताव पाठवा मी तातडीने निधी देतो असे आश्वासन भास्कर जाधवांना दिले.चिपळूण तालुक्यात सतत चार दिवस अवकाळी पाऊस कोसळला. मंगळवारी चक्रीवादळ होऊन गुहागर व चिपळूण तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेआहे
www.konkantoday.com