रत्नागिरीत आज मोठ्या प्रमाणावर दुचाकी व चारचाकी रस्त्यावर

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकडाऊनची मुदत वाढविण्याची घोषणा केली आहेरत्नागिरी शहर परिसरात मध्यंतरी वाहनचालकांवर पोलिस यंत्रणेने वाहन चालकांवर कडक कारवाई केल्यामुळे दोन दिवसांपर्यंत रत्नागिरी शहरात रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकी वाहनांची संख्या रोडावली होती कालपासून रस्त्यावर नागरिकही दिसू लागले होते आज रत्नागिरी शहरातील मुख्य रस्त्यांवर दुचाकी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती काही पॉइंटवर असलेल्या पोलिसांकडून चौकशी केली जात होते मात्र कुणालाही अडवण्यात येत नव्हते त्यामुळे मारुती मंदिर परिसरात केसीजैनच्या रस्त्याचा वापर करून उद्यमनगरकडे जाणाऱया दुचाकीची संख्याही लक्षणीय होती केसी जैन तसेच मारुती मंदिर परिसरातही अनेक दुचाक्या उभ्या होत्या याशिवाय काही ठिकाणी फोर व्हिलरसह रिक्षाही फिरताना दिसून आल्या यामुळे कोणत्याना कोणत्या कारणामुळे आज शहरातील रस्त्यांवर वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे दिसत होते
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button