
मुंबईतील चाकरमान्यांच्या कोकणात येण्याचा प्रयत्न असफल
मुंबईत सध्या मोठय़ा प्रमाणावर काेराेनाचे रुग्ण सापडल्याने मुंबईतील चाकरमान्यां मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे यामुळे हे चाकरमानी कोकणातील आपल्या गावाकडे परतण्यासाठी प्रयत्न करीत आहे सध्या जिल्हा बंदी केली असून ट्रेन व बसवाहतूक पूर्णपणे बंद आहेत.त्यामुळे काही करून कोकणात परतायचे असा निश्चय केलेले चाकरमानी रेल्वे रुळावरून चालत कोकणात निघाले असता पनवेल पोलिसांनी त्यांना पनवेल हद्दीत ताब्यात घेतले या ५७चाकरमान्यांना सध्या पनवेल महानगरपालिकेच्या निवारागृहात ठेवण्यात आले आहे
www.konkantoday.com