रत्नागिरी जिल्ह्यात 16 जूनपर्यंत ड्राेन उड्डाणास मनाई.

रत्नागिरी जिल्ह्यात दि. 17 मे ते 16 जून 2025 या कालावधीत ड्राेन किंवा इतर काेणतीही मानवरहित हवाई वाहने परवानगीशिवाय चालविण्यास किंवा उड्डाण करण्यास आली आहे, असा आदेश अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी दिला आहे. जिल्ह्यात काही असामाजिक तत्वांकडून ड्राेन किंवा इतर मानवरहित हवाई वाहने (युएव्ही) वापरले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेच्या ठिकाणांना धाेका निर्माण हाेवू शकताे आणि सार्वजनिक शांतता बिघडू शकते. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे आवश्यक असल्याने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 अन्वये ड्राेन किंवा इतर काेणतेही मानवरहित हवाई वाहने परवानगीशिवाय चालविण्यास किंवा उड्डाण करण्यास किंवा वापरण्यास मनाई करण्यात येत आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button