रत्नागिरी जिल्हयामध्ये काही ठिकाणी पुढील चाैविस तासात अतिमुसळधार पाऊस

रत्नागिरी जिल्ह्यात मंगळवारी दिवसभर पावसाची संततधार असतानाच कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्हया मध्ये काही ठिकाणी पुढील २४ तासात अतिमुसळधार पाऊस पडेल, असा इशारा वेधशाळेने दिला आहे.
रत्नागिरी शहर आणि परिसरात दिवसभरामध्ये तब्बल पाच इंच पावसाची नोंद झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी मंगळवारी पहाटेपासूनच वेगवान वाऱ्यासह जोरदार सरी कोसळण्यास सुरूवात झाली. त्या दिवसभर थोडे थांबत पुन्हा पडतच राहिल्या. गेले दोन दिवस पावसाचा जोर ओसरल्यामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाण्याच्या पातळीत घट झाली होती. पण मंगळवारी दिवसभरात पडेलल्या पावसामुळे जिल्ह्यातील नदी-नाले पुन्हा दुथडी भरुन वाहू लागले आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button