
आज स्वयंप्रेरणेने संचारबंदी म्हणजे जनता कर्फ्यू
माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांनी आज रविवार दिनांक 22 मार्च 2020 रोजी जनतेच्या स्वयंप्रेरणेने संचारबंदी असावी असे जाहीर केले आहे. याचा कालावधीआज सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत ठेवण्यात आलेला आहे. कोरोना व्हायरस च्या पार्श्वभूमीवर सदर आवाहन करण्यात आले असून या विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी हे आयोजन आहे. सोबतच याकाळात सेवा देणाऱ्या सर्वांसाठी नागरिकांनी सायंकाळी पाच वाजता आपापल्या खिडक्यांमधून बाल्कनीतून टाळ्या वाजवून तसेच थाळीनाद करून अभिनंदन करावे असेही आवाहन केले आहे.
www.konkantoday.com