
अखेर ते विद्यार्थी भारतात परतले
कोरोनाचा भारतात वाढता संसर्ग पाहता केंद्र सरकारने परदेशातील प्रवाशांवरही निर्बंध घातले आहेत. त्याचा फटका फिलिपीन्समध्ये शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना बसला हाेता भारतात येण्यासाठी निघालेल्याया विद्यार्थ्यांना सिंगापूर विमानतळावर रोखण्यात आले. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठपुराव्यानंतर अखेर ते विद्यार्थी भारतात परतले आहेत.
सध्या त्यापैकी मुंबईच्या बाहेरील विद्यार्थ्यांना सेव्हन हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, तर मुंबई येथिल विद्यार्थ्यांना पुढील १४ दिवसांसाठी घरी क्वारंटाईन करण्यात आलं आहे.
www.konkantoday.com