मुंबई-गोवा महामार्गावरील निवळी बाजारपेठेसंदर्भात ग्रामस्थांमध्ये ’दुमत’, काम रेंगाळण्याची शक्यता.

रत्नागिरी निवळी येथील ८०० मीटरचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या भागात नक्की फ्लायओव्हर ब्रीज होणार की रुंदीकरण, या बाबत स्थानिकांमध्येच दुमत असल्याने महामार्ग प्राधिकरण विभागाने या बाबत केंद्र सरकारकडून मार्गदर्शन मागवले आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील सहाव्या टप्याचे काम ७० टक्के पूर्ण झाले असले तरी या ८०० मीटरच्या भागासंदर्भात केंद्र सरकार नक्की कोणता निर्णय घेते, याकडे  सगळ्याचे लक्ष लागून राहिले आहे. रत्नागिरी शहरापासून २५ किलोमीटर लांब असलेल्या या बाजारपेठेवर परिसरातील काही गावे अवलंबून आहेत. तसेच अनेक वर्ष सुरु असलेली ही बाजारपेठ अनेकांची रोजीरोटी असल्याने ही बाजारपेठ नष्ट करून रुंदीकरण करण्यासंदर्भात संबंधित ग्रामस्थांचा विरोध आहे.

’येथे फ्लायओव्हर बांधण्यात यावा, असे या ग्रामस्थांचे मत आहे. तर काही ग्रामस्थांच्या मते या ठिकाणी रुंदीकरण करण्यात यावे आणि बाजारपेठ अन्यत्र हलवावी, असे मत आहे. या भागातील भूसंपादन पूर्ण झाल्यानंतर इथल्या ग्रामस्थांच्या मताप्रमाणे फ्लायओव्हरसाठी खांब उभारण्यास सुरुवातही करण्यात आली हाती. मात्र आम्हाला फ्लायओव्हर नकी तर रुंदीकरण हवे, असे काही ग्रामस्थांकडून म्हणणे मांडण्यात आले आणि फ्लायओव्हरचे काम  ठप्प पडले. यासंदर्भात गेले कित्येक वर्ष महामार्ग प्राधिकरण आणि जिल्हा प्रशासनासोबत अनेक बैठका घेण्यात आल्या. मात्र अजूनही या संदर्भात कोणताही तोडगा निघाल्याचे दिसत नाही.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button