रत्नागिरी शहरात काही भागात तीन दिवस पाणी नाही नागरिक नगरपालिकेवर धडकले


रत्नागिरी शहरातील परटवणे, राजीवडा, खालचीआळी भागात एैन सणांच्या काळात तीन दिवस पाणी न आल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी रत्नागिरी नगर परिषदेवर धडक मारली नगर परिषदेवर धडकलेल्या नागरिकांनी तीन दिवस नळाला पाणी नाही ,प्यायला पाणी नाही, टँकर मागितला तर मिळत नाही तर जेवण करायचे कसे असा सवाल नगराध्यक्ष बंडय़ा साळवी यांना विचारला नगर परिषदेकडून पाणी मिळत नसल्याने नागरिकांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे नागरिकांनी हा फुकटचा भुर्दंड का सोसावा असा सवालही यावेळी विचारण्यात आला यावेळी नगराध्यक्ष बंड्या साळवी यानी नादुरूस्त पाइपलाइनमुळे ही टंचाई निर्माण झाली असल्याचे सांगितले व पाण्याचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button