कोकणातील तीन जिल्ह्यांचा लवकरच कायापालट होणार,रेवस ते रेड्डी या सागरी मार्गाचा आराखडा तयार


कोकणातील तीन जिल्ह्यांचा लवकरच कायापालट होणार आहे.रेवस ते रेड्डी या सागरी मार्गाचा आराखडा तयार झाला आहे. त्याला राज्य सरकारची मंजुरी देखील मिळाली आहे. या मार्गामुळे कोकणातील पर्यटनाला चालना मिळणार आहे.

निसर्गाने कोकणाला भरभरून दिले आहे. कोकणात सात जिल्ह्यांचा समावेश होतो. त्यापैकी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यातील समुद्रकिनारे, प्रेक्षणीय स्थळे पर्यटकांना नेहमीच आकर्षित करत असतात. आता कोकणातील याच तीन जिल्ह्याचा कायापालट होणार आहे. कारण सागरी महामार्गाची सुरुवात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग असा असल्याने तेथील विकासाला चालना मिळणार आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालाच समांतर असलेल्या आणि अनेक वर्षापासून रखडलेला रेवस ते रेडी या सागरी महामार्गासाठी ही राज्य सरकारने 9 हजार 573 कोटींची तरतूद करत कोकणच्या पर्यटन विकासाची तुतारी फुंकली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन शहरे नव्याने विकसित करण्याचा प्रस्ताव सादर केल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांकडून मिळाली आहे. रेवस ते रेडी हा सागरी महामार्ग अद्यापही अविकसित आहे. तीन जिल्ह्यातून जाणारा हा महामार्ग अरबी समुद्राच्या किनाऱ्याने जातो.
विविध धार्मिक स्थळे, पर्यटन क्षेत्रे, समुद्रकिनारे, बंदरे, मासळी मार्केट, विमानतळ आधी या महामार्गावर आहेत त्यामुळे हा महामार्ग रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी वरदान ठरणार आहे. 540 किलोमीटरचा हा मार्ग दुपदरी असणार आहे.सागरी महामार्ग रायगड जिल्ह्यातून जात असल्याने या महामार्गामुळे जिल्ह्यातील अलिबाग, पेड, उरण, रोहा मुरुड, तळा, मासळा, श्रीवर्धन या प्रमुख शहरांच्या विकासासाठी विकासाच्या कक्षा रुंदावणार आहेत. त्याचबरोबर मांडवा, सासवणे, किहीम, वर्सोली, अलिबाग, आक्षी, नागाव, रेवदंडा,कोलई नांदगाव, मुरुड, दिघी, दिवेआगर, श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर या पर्यटन स्थळांना सागरी पर्यटनाचे महत्त्व वाढणार आहे.
रत्नागिरीतील मंडणगड,दापोली, गुहागर, रत्नागिरी ही प्रमुख शहरे आणि गणेशपुळे, पावस, नाणीज, आंबडवे या पर्यटन स्थळी अधिक विकास होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण, देवगड, वेंगुर्ला या शहरांमध्ये विकासाचा मार्ग मोकळा होईल.
Www.konkantoday.com

कोकणातील तीन जिल्ह्यांचा लवकरच कायापालट होणार आहे.रेवस ते रेड्डी या सागरी मार्गाचा आराखडा तयार झाला आहे. त्याला राज्य सरकारची मंजुरी देखील मिळाली आहे. या मार्गामुळे कोकणातील पर्यटनाला चालना मिळणार आहे.

निसर्गाने कोकणाला भरभरून दिले आहे. कोकणात सात जिल्ह्यांचा समावेश होतो. त्यापैकी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यातील समुद्रकिनारे, प्रेक्षणीय स्थळे पर्यटकांना नेहमीच आकर्षित करत असतात. आता कोकणातील याच तीन जिल्ह्याचा कायापालट होणार आहे. कारण सागरी महामार्गाची सुरुवात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग असा असल्याने तेथील विकासाला चालना मिळणार आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालाच समांतर असलेल्या आणि अनेक वर्षापासून रखडलेला रेवस ते रेडी या सागरी महामार्गासाठी ही राज्य सरकारने 9 हजार 573 कोटींची तरतूद करत कोकणच्या पर्यटन विकासाची तुतारी फुंकली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन शहरे नव्याने विकसित करण्याचा प्रस्ताव सादर केल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांकडून मिळाली आहे. रेवस ते रेडी हा सागरी महामार्ग अद्यापही अविकसित आहे. तीन जिल्ह्यातून जाणारा हा महामार्ग अरबी समुद्राच्या किनाऱ्याने जातो.
विविध धार्मिक स्थळे, पर्यटन क्षेत्रे, समुद्रकिनारे, बंदरे, मासळी मार्केट, विमानतळ आधी या महामार्गावर आहेत त्यामुळे हा महामार्ग रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी वरदान ठरणार आहे. 540 किलोमीटरचा हा मार्ग दुपदरी असणार आहे.सागरी महामार्ग रायगड जिल्ह्यातून जात असल्याने या महामार्गामुळे जिल्ह्यातील अलिबाग, पेड, उरण, रोहा मुरुड, तळा, मासळा, श्रीवर्धन या प्रमुख शहरांच्या विकासासाठी विकासाच्या कक्षा रुंदावणार आहेत. त्याचबरोबर मांडवा, सासवणे, किहीम, वर्सोली, अलिबाग, आक्षी, नागाव, रेवदंडा,कोलई नांदगाव, मुरुड, दिघी, दिवेआगर, श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर या पर्यटन स्थळांना सागरी पर्यटनाचे महत्त्व वाढणार आहे.
रत्नागिरीतील मंडणगड,दापोली, गुहागर, रत्नागिरी ही प्रमुख शहरे आणि गणेशपुळे, पावस, नाणीज, आंबडवे या पर्यटन स्थळी अधिक विकास होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण, देवगड, वेंगुर्ला या शहरांमध्ये विकासाचा मार्ग मोकळा होईल.
Www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button