
हातिस उर्सानिमित्त आजपासून एसटीच्या जादा गाड्या
रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध हातिसच्या पीर बाबरशेख उर्स ८ फेब्रुवारी रोजी साजरा होत आहे. यानिमित्त रत्नागिरी एस.टी. आगारातर्फे ७ ते ९ फेब्रुवारीपर्यंत जादा बस सोडण्यात येणार असल्याची माहिती आगार व्यवस्थापकांनी दिली.
यामध्ये ७ रोजी सकाळी ६ वाजल्यापासून प्रवासी उपलब्धतेनुसार रत्नागिरी रेल्वे स्थानक ते हातिस अशा जादा फेर्या सोडण्यात येणार आहेत. ८ रोजी सकाळी ६ वाजल्यापासून रत्नागिरी हातिस जादा फेर्या सोडण्यात येणार आहेत. ९ फेब्रुवारी रोजी पहाटे ४ वाजल्यापासून रत्नागिरी हातिस अशा जादा फेर्या सोडण्यात येतील.
तसेच हातिस उर्सानिमित्त रत्नागिरी बस स्थानकावरून रत्नागिरी हातिस राज्य परिवहन फेर्या प्रवाशांच्या सोयीसाठी सोडण्यात येणार आहेत. प्रवाशांनी सदर सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आगार व्यवस्थापकांनी केले आहे.
www.konkantoday.com