वीरश्री ट्रस्ट आणि सायकल क्लबच्या संयुक्त विद्यमाने ही सायकलची ‘कोकण भरारी’ मोहीम पार

रत्नागिरी ते गोवा हे ३१२ किलोमीटरेच अंतर तीन दिवसांत सायकलने पूर्ण करून रत्नागिरीतील दहा सायकलपटूंनी प्रदूषणमुक्त कोकणचा नवा संदेश सर्वांना दिला. वीरश्री ट्रस्ट आणि सायकल क्लबच्या संयुक्त विद्यमाने ही सायकलची ‘कोकण भरारी’ मोहीम पार पडली.
गोव्याला जाण्यासाठी पर्यटक मोठ्या उत्साहाने तयार असतात. परंतु गोव्याला सायकलिंग करून जात प्रदूषणमुक्त कोकण हा संदेश सर्वत्र पोहोचविण्याचा मान रत्नागिरीतील दहा सायकलपटूंना मिळाला. डॉ. नीलेश शिंदे, डॉ. तोरल शिंदे, डॉ. निशिगंधा पोंक्षे, कल्पेश चव्हाण, विनायक पावसकर, डॉ. नितीन सनगरे, मंगेश शिंदे, माधव काळे, सौ.निमा काळे आणि किरण चुंबळकर यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.
कोकणच्या सागरकिनाऱ्यावरून प्रवास करत तीन टप्प्यांत हा प्रवास पूर्ण झाला
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button