
रत्नागिरी गेल्या आर्थिक वर्षात मद्यप्रेमींनी १ कोटी १० लिटर मद्य रिचवले.
रत्नागिरी जिल्हा निसर्गसौंदर्यासाठी ओळखला जातो, पण आता तो मद्यपानाच्या विक्रमासाठीही चर्चेत आला आहे. आश्चर्य म्हणजे सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षात मद्यप्रेमींनी तब्बल १ कोटी १० लाख लीटर रिचवली आहे. हे आकडे पाहता जिल्ह्यात मद्याचा महापूरच आला आहे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. विशेष म्हणजे या मद्य महापुरात बिअरनेच बाजी मारली असून ५९ लाख लीटर बिअरचा खप झाला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात दारूचा खप प्रचंड वाढला आहे. १ कोटी १० लाख लीटरपैकी निम्म्याहून अधिक म्हणजे ५९ लाख लीटर बिअर फस्त झाली आहे. त्या खालोखाल ३४ लाख लीटर विदेशी मद्य आणि २० लाख लीटर देशी मद्याची विक्री झाली आहे. वाईनचा खपही १ लाख लीटरवर पोहोचला आहे. रत्नागिरीच्या तळीरामांनी मद्यपानात कसलीही कसर सोडली नसल्याचे हे आकडे सांगत आहेत.
एकीकडे मद्याचा विक्रमी खप होत असताना दुसरीकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारूविक्री आणि निर्मितीविरोधात जोरदार मोहीम उघडली आहे. वर्षभरात विभागाने विविध ठिकाणी धाडी टाकून ३ हजारपेक्षा जास्त गुन्हे दाखल केले आहेत. यात १३ वाहने जप्त करण्यात आली आहेत. सुमारे ४० हजार लीटर हातभट्टीची दारूही नष्ट करण्यात आली आहे.www.konkantoday.com