
आरटीओ कार्यालयाचा कारभार मराठीतून व्हावा -जनतेची मागणी
रत्नागिरी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील बहुतांशी प्रशासकीय कामकाजात मराठी भाषेला वगळण्यात आले आहे. वाहनांना परवाना देणे, नोंदणी नुतनीकरण मर्यादित कालावधीसाठी प्रवासी वाहतूक परवाना आदींसाठीचे अर्जांचे नमुने आजही इंग्रजीमध्ये आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना सदरचे अर्ज भरता येणे शक्य होत नाही. आता राज्यात मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मराठीला प्राधान्य देणारे सरकार आल्याने हा कारभार मराठीतून व्हावा अशी जनतेची मागणी आहे.
www.konkantoday.com