
बँकांची खाते आधारकार्डशी जोडली नसल्याने कर्जमाफीला पात्र असलेले शेतकरी अडचणीत
नैसर्गिक परिस्थितीमुळे शेतकरी अडचणीत आल्याने शासनाने महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना सुरू केली असून या योजनेमार्फत शेतकर्यांना कर्जमुक्ती मिळणार होती. रत्नागिरी जिल्ह्यातील ४ हजारच्यावर असलेल्या शेतकर्यांनी आपले आधारकार्ड क्रमांक बँकेच्या खात्याशी जोडला नसल्याचे आढळुन आले आहे. यामुळे हे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी अशा शेतकर्यांनी तातडीने आधारकार्ड बँकेच्या खात्याशी जोडणे आवश्यक असल्याने ते जोडून घ्यावे असे सांगितले आहे. कर्जमाफीसाठी ऑनलाईनवरून अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून ज्यांना ते शक्य नसल्यास त्यांना तहसिलदारांमार्फत ऑफलाईन अर्ज करण्याचा पर्याय ठेवण्यात आला आहे.
www.konkantoday.com