
जिल्ह्यात थंडीचे प्रमाण वाढले, आंबा, काजू बागायतदारांना चांगले दिवस
गेले काही दिवसांपासून जिल्ह्यातील वातावरणाच्या बदलामुळे पावसाने मुक्काम वाढविला होता. त्यानंतर पाऊस केल्यानंतरही आंबा व काजू पिकासाठी आवश्यक असलेले थंडीचे वातावरण झाले नव्हते. त्यामुळे आंब्याला मोहोर फुटण्याची प्रक्रिया लांबली होती. आता मात्र जिल्ह्यात चांगल्या प्रकारे थंडी पडू लागल्याने आंब्याला मोहोर फुटण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र ही प्रक्रिया आता सुरू झाल्याने यावेळी आंब्याचे पिक उशीरा येईल असा बागायतदारांचा अंदाज आहे.
www.konkantoday.com