
करंबवणे खाडीत मासे मृत ,प्रदूषित सांडपाण्याचा परिणाम
लोटे औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कारखान्यातून सुटणाऱ्या सांडपाण्यामुळे मच्छीमार हैराण झाले आहेत करंबवणे खाडीत प्रदूषित पाणी सोडले जाते त्यामुळे तेथील मच्छीमारांनी याबाबत तक्रार केली होती त्यानंतर हे प्रदूषित पाणी बंद झाले होते त्यामुळे या खाडीत मच्छीमारांना खेकडे कोळंबी सह मासळी मिळू लागली होती परंतु काल परत एकदा प्रदूषित पाणी सोडल्याने या खाडीतील मासे मृत होऊन किनाऱ्यावर येत आहेत .यामुळे मच्छीमारांच्यात असंतोष निर्माण झाला आहे .
www.konkantoday.com