
शासनाने मच्छीमारांना विशिष्ट आसाची जाळी वापरण्याचे आदेश दिले
मत्स्य दुष्काळावर उपाययोजना करण्यासाठी शासनाने मच्छीमारांना विशिष्ट आसाची जाळी वापरण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यात मत्स्य विभागाकडून नौकांवरील जाळ्यांची तपासणी सुरू झाली आहे. आतापर्यंत ७० मच्छीमारी नौकांची पथकाकडून तपासणी झाली आहे. त्या पथकाकडून दिलेले सर्टीफिकेट भविष्यात ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्या शिवाय समुद्रात मासेमारी करता येणार नाही, असे मत्स्य विभागाकडून सांगण्यात आले.
www.konkantoday.com