
८ नोव्हेंबरला रत्नागिरीत रंगणार पुलोत्सव,दर्जेदार कार्यक्रमांची मेजवानी
आर्ट सर्कल आणि पुण्यातील आशय सांस्कृतिकच्या वतीने पुलोत्सव यंदा ८, ९ आणि १० नोव्हेंबरला साजरा होणार आहे. यंदा पुलंचे जन्मशताब्दीपूर्ती वर्ष आहे. यानिमित्त पुलोत्सवात संगीत कार्यक्रम, नाटक आणि काव्य सादरीकरणाचे अनोखे कार्यक्र्रम रंगणार आहेत.गेली १२ वर्ष रत्नागिरीत आयोजित होत असलेला हा पुलोत्सव यंदा विशेष आहे.उद्घाटन दिवशी मैत्र हा अनोखा कार्यक्रम सादर होईल. पु. ल. वसंतराव देशपांडे, कुमार गंधर्व, मल्लिकार्जुन मन्सूर आणि गोविंदराव पटवर्धन यांची मैत्री सर्वश्रुत आहे. ही मैत्री प्रतिभा नामक एका मजबूत धाग्यात गुंफलेली होती.याच संकल्पनेवर मैत्र कार्यक्रम होणार आहे. पुलोत्सवात दुसर्या दिवशी म्हणजे ९ तारखेला नाटक सादर होणार आहे. १० नोव्हेंबरला पुलोत्सव समारोप होईल.संदीप खरे आणि वैभव जोशी या कवींच्या कवितेचे पुलोत्सवाच्या समारोप होणार आहे.
www.konkantoday.com