रत्नागिरी जिल्ह्यातील विजयी झालेल्या उमेदवारांचे मनोगत!


जनतेच्या विश्‍वासामुळेच विजयी!
ज्या जनतेच्या विश्‍वासामुळे आपण रत्नागिरी जिल्ह्यातील विजयी झालेल्या उमेदवारांचे मनोगत!
जनतेच्या विश्‍वासामुळेच विजयी!
ज्या जनतेच्या विश्‍वासामुळे आपण सलग चारवेळा चांगल्या मताधिक्याने निवडून आलो, त्या जनतेचे सर्वप्रथम आभार मानतो. महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा या विजयात मोलाचा वाटा आहे. जनतेचा विश्‍वास हाच आपला विजय आहे. कोकणातून सर्वाधिक ८७ हजार मताधिक्याने आपल्याला निवडून दिले आहे. आपण मतदारांना जी वचने दिली आहेत ती पूर्ण करणार आहोत. पाऊस थांबला की कामांना सुरूवात करू.
-उदय सामंत

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ

———
शिवसैनिकांच्या अथक परिश्रमाचा विजय!
हा सर्व शिवसैनिकांच्या अथक परिश्रमाचा विजय आहे. महायुतीमधील सर्वच पदाधिकारी, कार्यकर्त्यांना हा विजय मी समर्पित करतो. जात, पात, धर्माच्या विषारी प्रचाराचा थोडा फटका बसला. तरीही प्राप्त मतांवर मी समाधानी आहे. रोजगार निर्मितीला चालना देण्याचा मी यापुढे अधिक प्रयत्न करणार आहे.
-भास्कर जाधव

गुहागर विधानसभा मतदार संघ
———
विजय सर्वांच्या सहकार्याचा
सर्व शिवसेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्त्यांची मेहनत, मित्रपक्षांची मजबुत साथ, यामुळे हा विजय मिळाला आहे. राजापूर-लांजा -साखरपा परिसरातील मतदारांनी आपल्यावर जो विश्‍वास टाकला त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. मागील निवडणुकीपेक्षा यावेळी मताधिक्य कमी झाले याची जाणीव आहे. गेली ३५ वर्षे मी शिवसेनेमध्ये कार्यरत आहे. सेनेमुळेच सर्वसामान्य कार्यकर्ता ते आमदार या पदावर पोहोचलो आहे. बाळासाहेबांचा लाडका शिवसैनिक म्हणून माझी ओळख आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आपल्याला सन्मानाचे पद देतील असा विश्‍वास आहे.
-राजन साळवी

राजापूर विधानसभा मतदारसंघ
———
भगव्या पाईकांचा विजय!
हा विजय मतदारसंघातील भगव्या पाईकांचा आहे. दापोली विधानसभेचा खाली आलेला भगवा पुन्हा डौलाने फडकवण्यात शिवसैनिकांना यश आले आहे. आता दापोली विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास हे आपले एकमेव ध्येय आहे. आपला हा विजय सर्व शिवसैनिकांना समर्पित करत आहोत.
योगेश कदम-खेड दापोली विधानसभा मतदारसंघ
———
हा सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा विजय
गेल्या पाच वर्षात आपण प्रामाणिकपणे जनतेची सेवा केली. मतदार संघात सतत संपर्क ठेवला होता. पदावर नसताना विकास कामे केली. हा सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा विजय असून कार्यकर्त्यांच्या कष्टाचा विजय आहे. सर्वपक्षीय लोकांनी चांगले सहकार्य केले. त्यामुळेच हा मोठा विजय शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.
-शेखर निकमसलग चारवेळा चांगल्या मताधिक्याने निवडून आलो, त्या जनतेचे सर्वप्रथम आभार मानतो. महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा या विजयात मोलाचा वाटा आहे. जनतेचा विश्‍वास हाच आपला विजय आहे. कोकणातून सर्वाधिक ८७ हजार मताधिक्याने आपल्याला निवडून दिले आहे. आपण मतदारांना जी वचने दिली आहेत ती पूर्ण करणार आहोत. पाऊस थांबला की कामांना सुरूवात करू.

शेखर निकम-चिपळूण विधानसभा मतदारसंघ

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button