शिळ धरणातून शहराला पाणीपुरवठा करण्याच्या मागणीवरून सध्या राजकीय कलगीतुरा रंगू लागला

राजापूर शहरानजिकच्या शिळ येेथे धरण मंजूर झाले आहे. शहरानजिकच्या शिळ येथे धरण मंजूर असून त्या धरणातून शहराला पाणीपुरवठा करण्याच्या मागणीवरून सध्या राजकीय कलगीतुरा रंगू लागला आहे. या धरणाची उभारणी होण्यापूर्वीच तेथून राजापूर शहराला पाणीपुरवठा करण्याची सत्ताधारी कॉंग्रेसकडून केलेली मागणी हास्यास्पद असल्याची टीका भाजपच्या माजी नगरसेविका शीतल पटेल यांनी केली आहे. शिळ धरणातून शहराला पाणीपुरवठा करण्याची मागणी म्हणजे शहरामध्ये भीषण पाणीटंचाई आहे, ते सत्ताधार्‍यांकडून एकप्रकारे मान्य केले जात असून अनेक वर्षे नगर पालिकेमध्ये सत्ता भोगूनही पाणी टंचाई दूर करण्यात अपयश आल्याची कबुली असल्याचा टोलाही लगावला.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button