
रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाकडून सर्व नागरिकांना व तरुणांना आवाहन
दिनांक २४/१०/ २०१९ रोजी मत मोजणी प्रक्रिया होणार असून निवडणूक निकालानंतर काही अतिउत्साही तरुण मोटरसायकलच्या पुंगळ्या काढून विरोधकांच्या घरासमोरून फिरवणे तसेच विरोधकांच्या दरवाजा मध्ये फटाके वाजवणे ,गुलाल उधळणे,अर्वाच्य घोषणा देणे असे कृत्य करून आपापसात तेढ वाढवतात. त्यामुळे वाद होऊन मारामारी सारखे गंभीर गुन्हे घडतात व त्याचे दुष्परिणाम नागरिकांना व नातेवाईकांना भोगावे लागतात.
पुंगळ्या काढून मो/सा फिरवणाऱ्याचे मोटर सायकल वर कठोर कायदेशीर कारवाई करून अशा लोकांवर गुन्हे दाखल करण्यात येतील. कोणत्याही विजयी रॅलीला परवाणगी देण्यात येणार नाही.
आगामी दिवाळी सणाच्या कालावधीमध्ये गुन्हा दाखल झालेनंतर तुरुंगात/जेलमध्ये जाऊ नये म्हणून सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे
गुन्हा दाखल झाल्यानंतर खाजगी किंवा सरकारी कसलीही नोकरी मिळणार नाही.भविष्य काळ खुप अंधारात जाईल. याची जाणीव असावी.
*विजय शांततेत /संयमाने साजरा करणे गुन्हा नाही. परंतु पुंगळ्या काढून मो/सा फिरवणे,ट्रिपल सीट मोटार सायकल चालवणे, विरोधकांच्या घरासमोर फटाके वाजविणे, बेकायदेशीररित्या वाद्य लावून मिरवणूक काढणे अशा वेगवेगळ्या पद्धतीने विरोधकांना चिथाविणे देणें, समाजातील शांतता बिघडविणे, मागील वादावरून भांडण करणे, वाद निर्माण होण्यास कारणीभूत ठरणे, आवाजाचे प्रदूषण करणे हे गंभीर गुन्हे आहेत.. अशांवर सक्त कारवाई करण्यासाठी आम्ही तयारीत आहोत…*
आतापर्यंत मतदान प्रक्रिया उत्साहात पण शांततेत पार पाडल्या व रत्नागिरीच्या नावाला शोभेल असे सहकार्य केल्याबद्धल सर्व रत्नागिरीकरांचे जिल्हा पोलीस दल आभारी आहे, याचप्रमाणेच मतमोजणी प्रक्रियाही शांततेत पार पाडू या… आणि कायदा सुव्यस्था राखुयात
डॉ. प्रविण मुंढे
पोलीस अधीक्षक, रत्नागिरी