
देशात लोकशाहीचा विजय मात्र कोकणातील निकाल धक्कादायक -आ. भास्करशेठ जाधव
लोकसभा निवडणुकीचा एकंदरीत कल पाहिला तर हा लोकशाहीचा विजय आहे, असे मला वाटते. भाजपने ४०० पारचा नारा दिला होता, मात्र त्यांना हे यश साध्य करता आले नाही. एकंदरीत लोकशाहीचा देशात विजय झाला, अशी प्रतिक्रिया उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते, गुहागरचे आमदार भास्करशेठ जाधव यांनी दिली आहे.रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघामध्ये धक्कादायक निकाल लागला आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात हा निकाल अपेक्षित नव्हता, असेही त्यांनी सांगितले परंतु महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले आहे. त्याचा परिणाम विधानसभेलाही दिसून येईल. विधानसभेला महाराष्ट्रात मोठे यश महाविकास आघाडीला मिळेल, असा विश्वास व्यक्त करताना अबकी बार ४५ म्हणणार्यांना महाराष्ट्रातील जनतेने योग्य त्या शब्दात उत्तर दिले आहे, असेही जाधव यांनी सांगितले. दरम्यान आ. जाधव यांनी अनंत गीते यांना गुहागर मतदार संघातून मताधिक्य दिले आहे.www.konkantoday.com