स्वच्छता कामगार जुंपले अन्य कामाला रत्नागिरी शहरात सार्वजनिक ठिकाणी कचरा

रत्नागिरी नगर परिषदेचे स्वच्छता कामगार गेले अनेक दिवस रस्त्यावरील व अन्य सार्वजनिक ठिकाणी कचरा उचलण्यास येत नसल्याच्या नागरिकांच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत आहेत. यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर व सावर्जनिक ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. नगर परिषदेच्या स्वच्छता कामगारांना अन्य कामाला जुंपल्यामुळे रत्नागिरीत शहरातील स्वच्छता सध्या बंद आहे स्वच्छता अभियानात सहभाग घेणाऱ्या रत्नागिरी नगर परिषद नागरिकांना कचरा गाड्यात कचरा देण्याचे आवाहन करीत आहे मात्र आता सार्वजनिक ठिकाणचा कचरा कोण गोळा करणार असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत .
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button