रत्नागिरीतील जैन बांधवांचा स्तुत्य उपक्रम,भटक्या गुरांच्या शिंगाला चिकटवले रिफ्लेक्टिव्ह रेडियम

सध्या रत्नागिरी शहर व परिसरामध्ये भटक्या गुरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.रात्री अपरात्री अंधारात ही गुरे रस्त्यावर बसलेली असतात.अंधार असल्यामुळे वाहनचालकांना ही गुरे दिसत नाहीत व अपघात होता.त्याचप्रमाणे वाहनांची धडक बसल्याने ही मुकी जनावरे देखील जखमी होता.जैन समाज रत्नागिरि तर्फे रस्त्यावर मोकट सुटलेली गुरे वाहनचालकांना दिसण्यासाठी व गुरांना वाहनांचा धक्का लागू नये म्हणून त्यांच्या शिंगाना रेडियम लावण्यात आले.त्या मुळे रात्रि वाहन चालकांना सहजतेने ही जनावरें दिसतील.रत्नागिरी जैन समाजाच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button