
रत्नागिरीतील जैन बांधवांचा स्तुत्य उपक्रम,भटक्या गुरांच्या शिंगाला चिकटवले रिफ्लेक्टिव्ह रेडियम
सध्या रत्नागिरी शहर व परिसरामध्ये भटक्या गुरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.रात्री अपरात्री अंधारात ही गुरे रस्त्यावर बसलेली असतात.अंधार असल्यामुळे वाहनचालकांना ही गुरे दिसत नाहीत व अपघात होता.त्याचप्रमाणे वाहनांची धडक बसल्याने ही मुकी जनावरे देखील जखमी होता.जैन समाज रत्नागिरि तर्फे रस्त्यावर मोकट सुटलेली गुरे वाहनचालकांना दिसण्यासाठी व गुरांना वाहनांचा धक्का लागू नये म्हणून त्यांच्या शिंगाना रेडियम लावण्यात आले.त्या मुळे रात्रि वाहन चालकांना सहजतेने ही जनावरें दिसतील.रत्नागिरी जैन समाजाच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
www.konkantoday.com