
रत्नागिरी मतदारसंघात खंडाळा येथे पोलिसांतर्फे रूटमार्च
विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी तालुक्यातील जयगड सागरी पोलीस ठाणे अंतर्गत खंडा येथे आज पोलिसांच्यावतीने रुटमार्च करण्यात आला.रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात निवडणुकीदरम्यान शांतता व सुव्यवस्था राहावी कोणताही अनुचित प्रकार घडू नये मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी म्हणून हा रूट मार्च काढण्यात आला.यावेळी रत्नागिरी उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे,जयगड पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी श्री भोये तसेच अन्य पोलीस मोठया संख्येने उपस्थित होते.
www.konkantoday.com