
बंडखोरांची भूमिका आज तीन वाजेपर्यंत स्पष्ट होणार
विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना देखील रत्नागिरी व सिंधुदर्ग जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष व शिवसेना यांच्यातील असंतुष्ट कार्यकर्त्यांनी बंडखोरी केली आहे.राज्यात सेना भाजप युती आहे . रत्नागिरी जिल्ह्यातील पाचही जागांवर भाजपाला डावलण्यात आल्याने दापोली मतदारसंघातून केदार साठे, गुहागरमधून रामदास राणे, चिपळूणमधून तुषार खेतले व राजापूर मतदारसंघातून काही भाजपा पदाधिकार्यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत .तर तिकडे सिंधुदुर्गात कणकवली मतदारसंघात भाजप उमेदवारांच्या विरोधात शिवसेनेने उमेदवार उभा केला आहे. बंडखोरांना शांत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत मुख्यमंत्री फडणवीस देखील जातीने यात लक्ष घालत आहेत.आज दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे त्यामुळे बंडखोरी केलेल्यांची समजूत घालण्यात युतीच्या नेत्यांना यश मिळेल की नाही हे आता काही तासांनी स्पष्ट होईल .
www.konkantoday.com