वाटद एमआयडीसी रद्द करणार -आमदार उदय सामंत यांची घोषणा

रत्नागिरी तालुक्यातील वाटद येथे होणारी प्रस्तावित एमआयडीसी रद्द केल्याचा आदेश मी जानेवारी पर्यंत आणला नाही तर यापुढे पुन्हा कधीही मते मागण्यासाठी वाटद जिल्हा परिषद गटात येणार नाही अशी घोषणा रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी केली.वाटद एमआयडीसी रद्दची घोषणा आमदार उदय सामंत यांनी ग्रामस्थांसमोर येऊन करावी अशी ग्रामस्थांनी मागणी केली होती. याबाबत त्यांनी आमदार सामंत यांना निवेदनही दिले होते. यावेळी शेतकऱ्यांच्या बैठकीत बोलताना सामंतांनी सांगितले की सत्तर टक्के ग्रामस्थांनी विरोध केला तरी एमआयडीसी आपोआप रद्द होऊ शकते. शिवसेना शेतकऱ्यांबरोबर ठामपणे उभी राहील. निवळी एमआयडीसी मी शेतकऱ्यांवर बरोबर उभा राहुन रद्द करू शकलो तर वाटद एमआयडीसी मी शंभर टक्के रद्द करणार .
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button