मिर्या बंधाऱ्याचे काम दर्जेदार व्हावे यासाठी आता ग्रामस्थ लक्ष ठेवणार
समुद्राच्या उधानामुळे मिऱया गावाला धोका निर्माण झाला आहे. याआधी येथे करण्यात आलेली धुपप्रतिबंधक बंधाऱयाची कामे योग्य पद्धतीने झाली नाहीत. आता शासनाने मुंबईच्या मरीन ड्राइव्ह धर्तीवर बंधारा बांधण्याचे ठरवले असून त्यासाठी १९०कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. आता या बंधाऱयाचे काम दर्जेदार व्हावे ,निधीचा योग्य विनियोग व्हावा, कामात चुका राहू नये यासाठी गावातील ग्रामस्थांनी एकजूट केली असून ते या कामावर लक्ष ठेवणार आहेत यासाठी पत्तन विभागाचे अधिकारी व ग्रामस्थ यांच्यात एक सभा झाली.त्यात हा निर्णय घेण्यात आला. समुद्राच्या लाटा रोखण्यासाठी आता दगडांच्या पुढे दोन टनाचे टेट्रा पोड टाकून या दगडांवर चार मीटरचा काँक्रीट रस्ता बनवणेत येणार आहे. या कामाच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
www.konkantoday.com