
नवरात्रा पूर्वी भगवती मंदिर रस्ता दुरुस्त करा ,स्वाभिमान पक्षाची मागणी
येत्या काही दिवसांपासून सुरू होणाऱ्या रत्नदुर्ग किल्ल्यावरील नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी व या मार्गावर नादुरुस्त झालेले दिवे दुरुस्त करावेत अशी मागणी स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस रमाकांत आयरे यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. नवरात्राच्या काळात विविध भागातून भाविक या मंदिरात गर्दी करीत असतात यामुळे प्रशासनाने यात तातडीने लक्ष घालावे अशी मागणी करण्यात येत आहे.
www.konkantoday.com