कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र असा उलट सवाल विचारण्याची वेळ आली आहे -खासदार अमोल कोल्हे

युती सरकारच्या काळात सोळा हजार शेतकर्‍यांना आत्महत्या कराव्या लागल्या ,तिवरे धरण फुटीत तेवीस जणांचा बळी गेला.यामुळे आता गप्प बसून चालणार नाही या सरकारला कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र असा उलट सवाल करण्याची वेळ आली आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी चिपळूणच्या सभेत केले.शिवार यात्रेच्या निमित्ताने ते रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत ते पुढे म्हणाले या सरकारने वेळोवेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला ही महाराजांच्या स्मारकासाठी जलपूजन करून तीन वर्षे लोटली पण स्मारकाचा पत्ता नाही छत्रपतींच्या नावाने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी निघाली येवढे करून भागले नाही म्हणून आता गड किल्ले भाडय़ाने देण्याचे धाडस सरकार करणार असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही असाही इशारा कोल्हे यांनी दिला.
या सभेत त्यांनी राष्ट्रवादीचे नेते शेखर निकम यांचे कौतुक केले कोणतेही पद नसताना जो माणूस विकास कामाचा अहवाल देतो ज्याच्यासाठी एवढा जनसागर आला आहे. यामुळे शेखर निकम हे आमदार होणार ही काळय़ा दगडावरची रेघ आहे असेही त्यानी सांगितले.यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष श्री जयंत पाटील यांनीही शेखर निकम यांच्या पाठीशी पक्ष खंबीरपणे उभारणार असल्याची ग्वाही दिली.या अाधि शृंगारतळी येथे झालेल्या सभेत खासदार अमोल कोल्हे यांनी भास्कर जाधव यांचे नाव न घेता टीका केली.या सभेत बोलताना ते म्हणाले आता रडायचं नाही तर नाडायचे ,भिडायच, आणि मातीत गाडायच या भावनेने येणार्‍या विधानसभेच्या निवडणुकीत ज्यांनी पक्षाची गद्दारी केली आहे त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायची असेही त्यांनी आवाहन केले. रत्नागिरी जिल्ह्यात शिवस्वराज्य यात्रेच्या सभांना मोठा प्रतिसाद मिळाला.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button