कडकनाथ कोंबडीने रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नाडले

शेतीला जोड व्यवसाय म्हणून कडकनाथ कोंबडी व्यवसाय करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला.मात्र या कोंबडी घोटाळा प्रकरणात जिल्ह्यातील अडतीस शेतकऱ्यांची फसवणूक होऊन ते नाडले गेले आहेत.
काही वर्षांपूर्वी इमूपालन ची मोठी लाट आली होती. त्यामध्येही इमूच्या अंड्यापासून मांसापर्यंत मोठी मागणी असल्याचे भासवण्यात आले होते.त्यामुळे त्यावेळी देखील अनेक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता त्यात त्यांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाली होती.त्यानंतर कडकनाथ कोंबडीचे प्रस्त आले.या कोंबडयाचे मांस औषधी असून त्याच्या अंड्यालाही मागणी असल्याने हा व्यवसाय शेतकऱ्यांना पूरक ठरू शकतो असे काही कंपन्यांकडून शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण,दापोली, संगमेश्वर तालुक्यातील शेतकर्‍यांनी सांगली, इस्लामपूर येथील रयत ॲग्रो इंडिया कंपनीकडून कोंबड्यांचे युनिट घेतले.त्यानंतर या कोंबड्या व अंडी कंपनी घेणार असल्याचे करारही करण्यात आला. यामुळे शेतकऱ्यांनी त्यामध्ये ७५ लाख रुपये गुंतवले. सुरुवातीला काही महिने कंपनीने सेवा दिल्या मात्र त्यानंतर त्यांनी शेतकर्‍यांची फसवणूक केली. फसलेल्या शेतकऱ्यांनी आता पोलिसांकडे फसवणुकीबाबत निवेदन दिले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button