
चंद्रकांतदादा म्हणतात पहाटे पुन्हा भूकंप होणार, त्यांनी गजर लावलाय का?-शिवसेना नेते संजय राऊत
चंद्रकांतदादा म्हणतात पहाटे पुन्हा भूकंप होणार, त्यांनी गजर लावलाय का?, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे.
राज्यात निवडणुका होणार, की नाही होणार? हे सांगण्याची जबाबदारी निवडणूक आयोगाची असते. पण निवडणूक आयोगाची जबाबदारी चंद्रकांत पाटील यांच्याकडं आली असेल, तर त्याचं स्वागत केलं पाहीजे, असं म्हणत संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला आहे.
फडणवीसांना भेटलो तर एवढं वादळ निर्माण झालं. यापुढेही आम्ही अधूनमधून भेटत राहू. आमच्या भेटीमुळे कुणी नाराज असेल असं मला वाटत नाही, असं संजय राऊत म्हणालेत.
www.konkantoday.com