काश्मिरमधील भ्याड हल्ल्याची जबाबदारी TRF ने घेतली


तंकवादी हल्ल्याने जम्मू काश्मीर पुन्हा एकदा हादरलं आहे. दहशतवाद्यांनी हल्ला करत पर्याटकांवर बेठूट गोळीबार केला. यामध्ये एकूण २८ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान या हल्ल्याची दबाबदारी लष्कर-ए-तैयबाच्या हिट स्क्वॉड द रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) ने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.समोर आलेल्या माहितीनुसार, लष्करची ही संघटना द रेझिस्टन्स फ्रंट (TRF) २०१९ मध्ये अस्तित्वात आली. टीआरएफचा मास्टरमाइंड सज्जाद गुल असून हा पाकिस्तानमध्ये बसून ही संघटना चालवत असल्याचं समोर आलं आहे.टीआरएफचे दहशतवादी हे जम्मू काश्मीमध्ये सक्रिय असल्याची माहिती आहे. याची फंडिंग पाकिस्तानी सेना आणि ISI कडून होते. माहितीनुसार, या संघटनेचं नेतृत्व सज्जाद गुल, सलीम रहमानी आणि साजिद जाट यांच्याद्वारे केलं जातं. भारत सरकारने बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा (UAPA) अंतर्गत याला दहशतवादी संघटना घोषित करून त्यावर बंदी घातलीये.

जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा दलांवर तसंच नागरिकांवर झालेल्या हल्ल्यांसह अनेक दहशतवादी हल्ल्यांची जबाबदारी टीआरएफने स्वीकारलीये. गेल्या वर्षी जम्मू आणि काश्मीरमधील गंदरबलमधील झेडमोड बोगद्यात दहशतवादी हल्ला झाला होता, ज्यामध्ये ७ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. त्या हल्ल्यासाठी टीआरएफ जबाबदार असल्याचं मानलं जातंय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button