जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रमेश कदम यांना तडकाफडकी बदलले ,खेडचे विजय भोसले नवे जिल्हाध्यक्ष

रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रमेश कदम यांना पक्षानेपदावरून तडकाफडकी हटवले असून त्यांच्या जागी जिल्हाध्यक्ष म्हणून खेडचे विजय भोसले यांची नेमणूक करण्यात आली आहे.
काही महिन्यापूर्वी राष्ट्रवादी पक्षाला रामराम करत कदम यांनी काँग्रेसमध्ये समर्थकांसह प्रवेश केला होता त्यानंतर त्यांना जिल्हाध्यक्षपद देण्यात आले होते त्यांच्या नेमणुकीवर जिल्ह्यातील जुने काँग्रेस नेते संतुष्ट नव्हते त्यामुळे त्यांना अंतर्गत विरोधाचा सामना करावा लागत होता.लोकसभा निवडणुकीत कदम यांनी पक्षाचे काम न केल्याचा आरोपही पक्षाच्या उमेदवाराने केला होता.यामुळे कदम यांना पदावरून हटवले जाणार असे बोलले जात होते. आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने त्यांना तडकाफडकी पदावरून बाजूला केले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button