सार्वजनिक गणेशोत्सवासाठी देण्यात आलेल्या वीज सवलतीला अल्प प्रतिसाद

रत्नागिरी:जिल्ह्यात अनेक ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव साजरे केले जातात. त्यासाठी महावितरणकडून सवलतीच्या दरात खास वीज जोडण्या देण्यात येतात. असे असूनही या सवलतीच्या दरात वीज घेण्याच्या योजनेला अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात यावर्षी ११० सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. या ठिकाणी छोटे मोठे मंडप उभारून रोषणाई केली जाते. महावितरणकडून सवलतीच्या दरात जोडण्या या मंडळांनी घ्याव्यात यासाठी महावितरणने प्रयत्न करूनही केवळ १९ मंडळानी सवलतीच्या दरात जोडण्या घेतल्या आहेत. दरम्याने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी विजेची जोडणी करताना सर्व प्रकारची काळजी घ्यावी असे आवाहन महावितरणने केली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button