
राजापूर येथील अतिवृष्टीत एकजण बेपत्ता तर एक जण मृत्युमुखी
दोन तीन दिवसांपासून राजापूर तालुक्याला अतिवृष्टीचा फटका बसला आहे.राजापूर तालुक्यातील आडवली येथील रघुनाथ कोकाटे हे वाहळाच्या पुराच्या पाण्यात वाहून गेले त्यांचा मृतदेह गावापासून काही अंतरावर सापडला. मोर येथील शांताराम साळवे हे बेपत्ता झाले असून ते मुलीकडे जाण्यासाठी निघाले होते.त्यांना काही जणांनी नदीच्या किनारी शेवटचे बघितले होते.त्यामुळे ते पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत का याचा शोध सुरू आहे.
www.konkantoday.com