रत्नागिरी कोल्हापूर रस्त्यांकडे दुर्लक्ष खड्ड्यांचे साम्राज्य

रत्नागिरी-कोल्हापूर रस्त्यांकडे सध्या खात्याचे दुर्लक्ष
झाले आहे. या मार्गावर प्रचंड खड्डे पडले आहेत.यामुळे या मार्गावरून प्रवास करणे कठीण होऊन बसले आहे.रत्नागिरी कोल्हापूर हा मार्ग पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे.या मार्गावरूनच कोकणला दूध, भाजीपाला पुरवठा केला जातो.तर वैद्यकीय दृष्टय़ा देखील अनेक रुग्णांना कोल्हापूर येथे उपचारासाठी नेण्यासाठी या मार्गाचा वापर होतो. मात्र सध्या या मार्गाची दुरावस्था झाली असून आंबा घाटात देखील मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत.आंबा गावापासून मलकापूर या मधल्या टप्प्यात देखील कोल्हापूर हद्दीत प्रचंड खड्डे पडलेले आहेत.या रस्त्यावरून दुचाकी तर सोडाच परंतु चारचाकी वाहने चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे.दरवर्षी पावसात या रस्त्याची अशी अवस्था होत असताना देखील खात्याकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
www.konkantoday.com
_______________________
कोकण टुडे वर जाहिरातीसाठी संपर्क-९५०३९५५९५९

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button