पावसाचा जोर, रस्त्यावरील खड्डे आणि वाहतुकीची कोंडी यामुळे कोकणात येणार्‍या चाकरमान्यांचे हाल

कोकणातील महत्त्वाचा गणपती उत्सवासाठी चाकरमानी मोठया प्रमाणात कोकणाकडे येत आहेत.कालपासून चाकरमान्यांनी कोकणाकडे धाव घेतली असून खाजगी वाहने,बसेस,एसटी बसेस आदींच्या माध्यमातून हे चाकरमानी कोकणात उत्सवासाठी दाखल होत आहेत. गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर हजेरी लावण्यास सुरुवात केल्याने जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे.मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे पावसापूर्वी भरले जातील असे आश्वासन राज्यकर्त्यांनी वारंवार दिले असले तरी प्रत्यक्षात या मार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे.त्यात चाकरमानी मोठ्या संख्येने खासगी वाहने घेऊन कोकणाकडे येत असल्याने या रस्त्यावरून येणाऱ्या वाहनांची संख्या मोठय़ा प्रमाणावर वाढली असून अनेक ठिकाणी वारंवार वाहतुकीची कोंडी होत आहे.खेड जगबुडी येथे वाहतूक कोंडीमुळे अनेक तास वाहतूक खोळंबली होती.याशिवाय ठिकठिकाणी महामार्गाचे काम चालू असल्याने त्याचाही परिणाम वाहतुकीवर होत आहे.कोकणात येणार्‍या पर्यायी मार्गावर देखील अशाच प्रकारे स्थिती आहे.एकुणच गणपती सणासाठी येणार्‍या चाकरमान्यांना मोठ्या अडचणीला तोंड द्यावे लागत आहे.याशिवाय या समस्यांमुळे प्रवासाचा वेळही मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button