रत्नागिरी जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांचा राजीनाम्याचा निर्णय मागे

सर्व सभासदांच्या आग्रही मागणी नंतर रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी आपला राजीनाम्याचा निर्णय मागे घेतला आहे.
शनिवारी जिल्हा बँकेची वार्षिक सभा झाली त्यावेळी सभासदांनी हि आग्रही मागणी त्यांच्याकडे केली होती.बँकेच्या संचालक मंडळाचा कालावधी संपण्याआधीच बँकेचे विद्यमान अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी बँकेच्या कारभारातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता.यासंदर्भात आपल्या सर्व सहकारी सदस्यांना पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.डॉ. चोरगे यांनी राजीनामा देऊ नये यासाठी बँकेचे अधिकारी, कर्मचारी यांनी त्यांची भेट घेऊन त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला होता.तर आज शनिवारी बँकेची वार्षिक सभा होती, यावेळी बँकांच्या सभासदांनी हा निर्णय मागे घेण्याची विनंती डॉ चोरगे यांना केली होती. अखेरीस या विनंतीला मान देऊन डॉ. चोरगे यांनी राजीनाम्याचा निर्णय मागे घेत असल्याचे जाहीर केले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button