जिल्ह्याला सुस्थितीत आणण्यासाठी ४४८कोटींची गरज

रत्नागिरी जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे व पुरामुळे खासगी व सरकारी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या अतिवृष्टीत खाजगी मालमत्ता, रस्ते महामार्ग, संरक्षण भिंती,शहरातील रस्ते, खारलॅण्ड बंधारे, जेटी, जलसंपदा, महावितरण यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. रत्नागिरी जिल्हय़ाला सुस्थितीत आणण्यासाठी ४४८कोटींची आवश्यकता असल्याची मागणी केंद्रीय पथकाकडे केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.केंद्राचे पथक नुकतेच रत्नागिरी जिल्ह्यातील पूरग्रस्त परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आले होते.या सदस्यांनी विविध ठिकाणी भेट दिली ते आपला अहवाल केंद्राला सादर करणार आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button