
भाजपच्या गळाला लागायला रत्नागिरीत मासे शिल्लक कुठे आहेत : आ.प्रसाद लाड यांचा सवाल
भाजपमध्ये सध्या मेगा भरती सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील कोणते मासे भाजपच्या गळाला लागणार असा पत्रकारांनी सवाल आमदार प्रसाद लाड यांना केला त्यावर प्रतिक्रिया देताना आमदार लाड म्हणाले रत्नागिरी जिल्ह्यात भाजपच्या गळाला लागायला मासे शिल्लकच आहेत कुठे? रत्नागिरी जिल्ह्यात आता एखादाच मासा गळाला लागण्या सारखा उरला आहे. तोही लवकरच लागेल
महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादीचे जहाज बुडत असल्याने या बुडत्या जहाजावर कोणी राहण्यास तयार नसल्याने त्यातून सर्वजण उड्या मारण्यास तयार आहेत.असे सांगून ते पुढे म्हणाले आता तटकरे देखील भाजपच्या संपर्कात आहेत मात्र ते तटकरे कोण आहेत हे माहित नाही हे तटकरे कोण आहेत हे लवकरच कळेल. एकूणच रत्नागिरी दौर्यावर आलेल्या आमदार प्रसाद लाड यांनी अनेक राजकीय गुगल्या टाकल्या आहेत.
www.konkantoday.com