ग्रामसेवकांच्या काम बंद आंदोलनामुळे ग्रामपंचायतीचे कामकाज ठप्प

रत्नागिरी: ग्रामसेवकांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शासनाने ठोस भूमिका न घेतल्यामुळे जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी बेमुदत काम बंदचे हत्यार उपसले आहे. जिल्ह्यात एकूण ६२५ ग्रामसेवक असून या ग्रामसेवकांनी शासनाकडे आपल्या संघटनेमार्फत वेळोवेळी मागण्या सादर केल्या होत्या. परंतु त्याकडे शासनाने लक्ष न दिल्याने ग्रामसेवकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. या ग्रामसेवकांनी आपापल्या ग्रामपंचायतीच्या किल्ल्या गटविकास अधिकार्‍यांकडे सुपूर्द केल्याने सर्व ग्रामपंचायतीचे काम ठप्प झाले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button